'Raat Akeli Hai 2': या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सोबतच अनेक प्रसिद्ध कलाकार असणार आहेत. पहिल्या भागात नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी आणि इतर कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सिक्वेलमध्ये, कथेला पुढे घेऊन जाणारे नवीन पात्र आणि अनपेक्षित वळणं असू शकतात. पहिल्या भागाच्या यशानंतर, या चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांना उच्च अपेक्षा आहेत. हा चित्रपट आहे 'रात अकेली है'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाची कथा एका छोट्या शहरातील पोलीस अधिकाऱ्याची आहे, इन्स्पेक्टर जलीत यादव जो एका वृद्ध सदस्याच्या मृत्यूच्या चौकशीत गुंततो. पहिल्या भागात जो थरार आणि गूढता होती, त्याच तंत्राने सिक्वेलमध्येही गूढतेचं मिश्रण पाहायला मिळेल, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक उत्सुकता लागून राहील. तसेच, दिग्दर्शक हनी त्रेहान आणि लेखक दिनेश विजय यांनी या चित्रपटाच्या कथेला एक नवा दृषटिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे.


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/raatakelihain.png


नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, 'रात अकेली है 2' व्यतिरिक्त, तो लवकरच मॅडॉक फिल्म्सच्या 'थामा' मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत, ज्यामध्ये एक रोमांचक आणि भावनिक कथा असणार आहे. नवाजुद्दीनचे अभिनय कौशल्य असलेले विविध चित्रपट आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कायम प्रशंसा मिळाली आहे. 


हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागतोय 'हा' युट्यूबर; म्हणाला 'जर मुलगा मानलंच आहे तर...'


नवाजुद्दीनने अभिनयाच्या क्षेत्रात आपली छाप 'सरफरोश', 'मुन्ना भाई एमबीबीएस', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'द लंचबॉक्स', 'किक', 'बजरंगी भाईजान' आणि 'रईस' सारख्या चित्रपटांद्वारे सोडली आहे. 'रमन राघव 2.0', 'मॉम' आणि 'मंटो' मध्ये त्याच्या भूमिकांना अभिनेता म्हणून त्याने नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. त्याच्या अभिनयात असलेला गोडवा, वेदना आणि कडवटपणाची किमया त्याला प्रेक्षकांमध्ये खास स्थान देत आहे.


याशिवाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये अनेक मनोरंजनाचे अनोखे आणि वेगवेगळे फ्लेवर असू शकतात, जे त्याच्या अभिनयाची नवी आव्हाने घेऊन येतील. त्याच्या अभिनयाच्या विविधतेमुळे, तो प्रत्येक भूमिकेत नवा रंग दाखवतो आणि या सिक्वेलमध्येही तो प्रेक्षकांना एक नवा अनुभव देईल, असं निश्चितच म्हटलं जाऊ शकतं.