मुंबई :  नेहा धूपिया आणि अंगद बेदी हे दोघे १० मे ला विवाहबद्ध झाले. दिल्लीतील गुरुद्वारामध्ये शीख पद्धतीने दोघांनी विवाह केला. त्यांच्या या सिक्रेट विवाहमुळे बॉलिवडूलाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर नेहा प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांनी लवकर लग्न केले, अशा चर्चा रंगू लागल्या. नेहा धुपियाचे वडील प्रदीप धूपियांनी या चर्चांवर खुलासा केला. ते म्हणाले की, असे काहीही नाही. फक्त दोघांनी घाईत लग्न केले म्हणून लोकांचा असा समज झाला आहे. बोलणारे तर काहीही बोलतात. त्यांच्या मनाप्रमाणे अफवा पसरवतात.


तरीही अफवा थांबल्या नाहीत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहाच्या वडीलांनी खुलासा केल्यानंतरही या अफवा थांबल्या नाहीत. म्हणून आता यावर अंगद बेदीने स्पष्टीकरण दिले आहे. लग्नानंतर पहिल्यांदा मुलाखत देताना नेहा-अंगदने सांगितले होते की, त्यांनी लग्नाचा निर्णय एका रात्रीत घेतला होता.


नेहा म्हणते...


नेहाने सांगितले की, अंगदच्या आईला मी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वीच भेटली होती. त्यांनी मला विचारले की, खरंच तू अंगदसोबत लग्नाला तयार आहेस का? आणि मग आठवड्याभरात आमचे लग्न झाले. याबद्दल फक्त करण जोहरलाच माहिती आहे.


मुलांबद्दल विचारले असता नेहा म्हणाली की, या सर्व लांबच्या गोष्टी आहेत. काम आणि मुलांमध्ये बलन्स राखणे अत्यंत गरजेचे आहे. आता सध्या कामाकडे लक्ष देत आहे. पण कुटुंबासाठी मुले असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून कामातून फ्री झाल्यावर याबद्दल विचार करु.