मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. याआधी चित्रपटातील दोन गाणे प्रदर्शित केली. आता चित्रपटातील तीसरं गाणं चाहत्यांच्या भेटीस आले आहे. 'ऐथै आ' असे नुकताच प्रदर्शित झलेल्या गाण्याचे नाव आहे. इरशाद कामिल यांनी 'ऐथै आ' गाण्याची रचना केली आहे. नीति मोहन, अक्सा सिंह त्याचप्रमाणे विशाल शेखर यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्यामध्ये लग्नाचा माहोल दाखवण्यात आल आहे. खुद्द सलमान खानने त्याच्या सोशल अकाउंटवरून हे गाणं प्रदर्शित केलं आहे. बुधवारी दबंग खानने गाण्याचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख पोस्ट केली होती. गाणं प्रदर्शित होताच इन्टरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.


'भारत' चित्रपटा माध्यमातून पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर हे कलाकारही चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 


'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.