मुंबई : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. आज पंकज त्यांचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील एक खास गोष्ट जाणून घेऊया. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी पंकज त्रिपाठी पटना येथील मौर्या हॉटेलमध्ये काम करायचे. त्यादरम्यान, त्या हॉटेलमध्ये पंकज यांनी चप्पल चोरल्याचा खुलासा एका शोमध्ये केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आणि पंकज त्रिपाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते, त्यादरम्यान अभिनेत्यानं हा किस्सा सांगितला. यावेळी पंकज त्रिपाठी यांची पंकज यांची चप्पल चोरल्याचं सांगितले. 'त्यावेळी मी मौर्या हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर होतो. मला मनोज वाजपेयी आपल्या हॉटेलमध्ये आले आहेत असं फोन करून कळवण्यात आलं. किचनमधल्या लोकांना माहीत होतं की मी थिएटर करायचो, म्हणून त्यांनी सांगितलं की मनोज आले आहेत, म्हणून मी त्यांना भेटायला गेलो,' असे पंकज त्रिपाठी म्हणाले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे पंकज त्रिपाठी म्हणाले,'मी म्हणालो भैया, मी थिएटर करतो, पाय पडून आशीर्वाद घेऊन निघालो. दुसर्‍या दिवशी मला कळलं की ते त्यांची चप्पल विसरले आहेत. मी हाऊस किपिंगला सांगितलं की चप्प जमा करू नका मला द्या.  एकलव्याप्रमाणे त्यांच्या चप्पलमध्ये मी माझा पाय ठेवला तर कदाचित माझा उद्धार होईल.'


पंकज त्रिपाठी यांचा चित्रपट प्रवास इतका सोपा नव्हता. चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. छोट्या शहरातून ते मुंबई त्यांचा प्रवास हा खूप कठीण होता. पण 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली. 'मिर्झापूर'मधील कलिन भैया या त्यांच्या पात्राने त्यांना मोठा अभिनेता बनवलं.