मुंबई : हिंदी मालिका 'पहरेदार पिया की'  च्या निर्मात्यांनी सोमवारी सांगितले की, त्यांना आतापर्यंत कोणतीही नोटीस मंत्रालयाकडून शो बंदच्या बाबतीत देण्यास आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे कोणत्याही कारणामुळे हा शो बंद न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या मालिकेत १८ वर्षाची मुलगी आणि ९ वर्षाच्या मुलामधील लग्नामुळे ही मालिका चर्चेत आली होती. त्याचप्रमाणे या मालिकेत त्यांचा हनीमून देखील दाखवण्यात आला होता. आणि या मुळेच या मालिकेला कडाडून विरोध होत होता. 


मालिकेचे निर्माते शशी आणि सुमीत मित्तल यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांच्यामते काहीही झाले तरी ते ही मालिका बंद करायला तयार नाहीत. ते सांगतात, आम्ही समाजामध्ये चुकीचा संदेश देत आहोत असे आम्हाला वाटत नाहीये. आम्ही आमच्या मालिकेत कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाहीये असेच आम्हाला वाटते. आमच्या मालिकेचा एकही भाग पाहिलेला नसताना काही जण मालिकेवर प्रतिक्रिया देत आहेत, हे खूपच चुकीचे आहे. 


तुम्ही ही मालिका पाहात असल्यास तुम्हाला काहीही चुकीचे वाटणार नाही असे मी खात्रीने सांगू शकतो. मालिकेत फुलांनी सजवलेल्या बेडवर दिया आणि रतन यांना तुम्ही कसे काय दाखवू शकता असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. पण आम्ही त्यात काहीही आक्षेपार्ह दाखवलेले नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मालिकेच्या कथानकात काहीही बदल करणार नाही आहोत तसेच आजपर्यंत आम्हाला कोणीही लीगल नोटिस पाठवलेली नाहीये. भविष्यात कोणी नोटिस पाठवली तर त्यावर आम्ही नक्कीच विचार करू. पण अद्याप कोणीही कोणतीही नोटीस आम्हाला पाठवलेली नाही, असं देखील ते म्हणाले.