मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलचे विचार मीडियासमोर ठेवले आहेत. मीडियाशी बोलताना तिने म्हटलं की, नरेंद्र मोदी हे 2019 ची निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत आले पाहिजे. पीएम मोदी खऱ्या अर्थाने लोकशाहीचे नेते आहेत.' कंगना शनिवारी 'चलो जीते हैं'च्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित होती. हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत असल्याची चर्चा आहे. सिनेमा खूप सुंदरपणे बनवल्याचं कंगनाने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंसिटिव्ह नेचर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनात कशा प्रकारे कष्ट घेतले. मला वाटतं हे नुसतं त्यांच्याबद्दल नाही आहे तर आपल्या सगळ्यांबद्दल आहे. कसा प्रकारे संपूर्ण समाजाला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा आपल्या जीवनाचा एक भाग आहे.'


पीएम मोदी यांचे सत्तेतील 4 वर्ष आणि भाजप सरकारबद्दल जेव्हा तिला तिचं मत विचारण्यात आलं तेव्हा कंगनाने म्हटलं की, 'पीएम मोदी सगळ्यात योग्य उमेदवार आहेत. असं नाही आहे की हे पद त्यांनी त्यांच्या आई-वडिलांमुळे मिळवलं आहे. ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे नेते आहेत. आपण त्यांना आपले पंतप्रधानच्या रुपात निवडलं आहे. हे त्यांच्याकडून हिसकावून नाही घेतलं जावू शकत. त्यांनी खूप मेहनत करुन हे पद मिळवलं आहे. पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर शंकेचा कोणता प्रश्नच नाही येत.'