मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. प्रियंकाच्या चाहत्यांना तर प्रियंका-निकच्या लग्नाची खूप उत्सुकता आहे. पण प्रियंका आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलते. 


या गोष्टीची वाटते भीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये कोणीही गॉड फादर नसताना तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. यावरच ती थांबली नाही तर हॉलिवूडपर्यंत ती मजल मारली. आता हॉलिवूडमध्येही तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 
अलिकडेच प्रियंका चोप्राने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. प्रियंकाने सांगितले की, तिला अपयशाची खूप भीती वाटते. ती म्हणाली की, मला अपयशाबद्दल द्वेष आहे. मी अपयश हाताळू शकत नाही. जेव्ह कधी मी एखाद्या कामात अपयशी होते. तेव्हा माझी आई म्हणते की, काही काळासाठी तिला एकटीला सोडा.


...म्हणून तर नाही ना सोडला भारत?


आता प्रियंकाच्या या रहस्याचा उलघडा झाल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, तिला सलमान खानपासून कोणतीही समस्या नाही. तर काहीतरी विचार करुनच तिने भारत सिनेमातून माघार घेतली. कदाचित अनेक अभिनेत्रींच्या उपस्थितीमुळे अपयशाची भीती असू शकते. पण प्रियंकाची ही भीती देखील स्वाभाविक आहे. कारण तिने यशाचा हा पल्ला गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.