मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राजी सिनेमातील नवे गाणे दिलबरो प्रदर्शित झाले. या गाण्याचे शब्द कविवर्य गुलजार यांनी लिहिले असून प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने हे गायले आहे. गायिकेचा आवाज हृदयाला स्पर्शून जातो. गाण्यात वडील-मुलीचे सुंदर नाते दाखवले आहे. मुलीच्या पाठवणीचे हे गाणे भावूक करणारे आहे. गाण्यात कश्मिरी बोल वापरण्यात आले आहेत. एका साध्यासुध्या काश्मीरी मुलीची ही कथा आहे. जिला पाकिस्तानात हिंदुस्तानाचे डोळे आणि कान बनवून पाठवले जाते.


गाण्याबद्दल आलिया म्हणते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याबद्दल आलियाने ट्वीट केले की, दिलबरो गाण्याने मला रडवले. या गाण्याचे बोल अतिशय साधे पण भावनेने ओथंबलेले आहेत. हे गाणे पाहताना मला माझा हात धरलेल्या वडीलांची आठवण आली. ही पोस्ट शेअर करत आलियाने लिहिले, लव्ह यू पापा. 



सत्य घटनेवर आधारित सिनेमा


हरिंदर सिक्का यांच्या उपन्यास कॉलिंग सहमत यावर आधारलेला हा सिनेमा एक सत्य घटना आहे. कथा अत्यंत सुंदररित्या लिहिली आहे. ट्रेलरमध्ये आलिया एक साधीसुधी मुलगी दिसते. एक अशी मुलगी जिला हेरगिरीतील काहीच माहिती नाही. मात्र संपूर्ण देशाच्या संरक्षणाची जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकली जाते आणि तिला हिंदुस्तानचे डोळे आणि कान बनवून पाकिस्तानात पाठवले जाते. तेव्हा काय होते? ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सिनेमात विक्की कौशल प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले असून सिनेमा देशभक्ती ओतप्रोत भरलेला आहे.