मुंबई : आलिया भट्टच्या आगामी 'राझी' चित्रपटाचा टायटल ट्रक काही वेळापूर्वी रीलिज करण्यात आला आहे. या गाण्यापूर्वी 'राझी' चित्रपटातील 'ए वतन' आणि 'दिलबरो' ही दोन गाणी रीलिज करण्यात आली आहेत. या गाण्यांना चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. 


प्रेक्षकांवर 'राजी' गाण्यांची भूरळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ए वतन' हे गाणं देशभक्तीपर आहे तर 'दिलबरो' हे गाणं मुलीच्या लग्नानंतरच्या 'विदाई' सोहळ्यावर आधारित आहे. या दोन गाण्यांनंतर 'राजी' चित्रपटातील टायटल ट्रक रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याची चालही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल. 



खास आहे गाणं 


सत्यकथेवर आधारित 'राझी' चित्रपटात एका महिला गुप्तहेराची कहाणी रंगवण्यात आली आहे. मूळची भारतीय असलेली एक महिला गुप्तहेर पाकिस्तानमध्ये लग्न करून जाते. तेथे पाकिस्तानात राहून भारतासाठी कसं काम करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  


मेघना गुलजारचं दिग्दर्शन 


'राझी' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. तर या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन शंकर एहसान लॉय यांनी केलं आहे. या गाण्याचे शब्द गुलजार यांचे आहेत. 'राझी' हा चित्रपट 11 मे ला रीलिज होणार आहे.