मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी तिच्या वायफळ वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. अता चक्क ती चहत्यांना लग्न न करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. ६ महिन्यांपूर्वी तिने एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केलं होतं पण अता असं काय झालं, की ती 'शादी मत करो' असं बोलताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती 'शादी मत करो' असं म्हणताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


तिच्या या टिक टॉक व्हिडिओनंतर नेटकरी 'लग्नाना कंटाळली का?' असे अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. राखीने २८ जुलै २०१९ मध्ये मुंबईच्या जेडब्ल्यू मेरीयट हॉटेल मध्ये लग्न केले होते. परंतु तिच्या लग्नाचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही. 


राखीसध्या तिच्या 'मुद्दा ३७० जे एण्ड के' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट दिल्लीत प्रदर्शित होणार आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.