मुंबई : सतत वायफळ बडबड करणारी ड्रामा क्वीन राखी सावंत विवाह बंधनात अडकली असल्याचे समोर येत आहे. २८ जुलै रोजी एका एनआरआय व्यक्तीसोबत गुप्तपणे विवाह केला असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मुंबईच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये अवघ्या ४ ते ५ माणसांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झला असल्याच्या अफवांना खुद्द राखीने पूर्णविराम दिला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी लग्न बंधनात अडकलेली नाही. काल जे डब्लू हॉटेलमध्ये माझा एक कॅटलॉग फोटोशूट होता. कोणत्याही अभिनेत्रीने मेंहदी काढली याचा अर्थ ती लग्न करत आहे असा होत नाही. सिंदूर भरलं म्हणजे लग्न झाले असे नाही. आम्ही कोणती मालिका किंवा शूटींगमध्ये सुद्धा व्यस्त असू शकतो.' असे वक्तव्य करत राखीने तिच्या लग्नाच्या चर्चांना फेटाळले आहे. 


याआधी राखी दीपक कलाल याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. परंतू तिने त्याच्यासोबत लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. २००४ मध्ये राखीने 'परदेसिया' गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर असरफ या तरूणासोबत लग्न केले होते. 


परंतू, या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर तिने 'राखी का स्वयंवर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा लग्न केले. तिचे ते लग्न सुद्धा अयशस्वी ठरले.