मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्सना जशी या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता होती तशीच ती त्यांच्या सहकाऱ्यांनाही लागून होती... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण विरुष्कानं इटलीला एका खाजगी सोहळ्यात लग्न उरकलं... यासाठी त्यांनी कुटुंबाव्यतिरिक्त कुणालाही आमंत्रण दिलेलं नव्हतं... त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला... यामध्ये अभिनेता आणि अनुष्काचा सह-अभिनेता रणबीर कपूरचाही समावेश आहे. 


रणबीर कपूर सोशल मीडियावर नसला तरी त्याचं एक फॅन पेज आहे... यावरून रणबीरशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. रणबीरनं नुकतंच आपल्या या फॅन पेजवरून आपल्या फॅन्ससोबत संवाद साधला. 


यावेळी विरुष्काशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना 'मला त्यांच्या लग्नाला हजेरी लावायची होती... मी इतका उत्सुक होतो की हातावर मेहंदीही काढली होती... पण अनुष्कानं मला आमंत्रणच दिलं नाही...' अशी नाराजी रणबीरनं व्यक्त केली. 

तर दुसऱ्या एका फॅननं 'चन्ना मेरेया गाण्याशिवाय विरुष्काचा विवाह अपूर्ण असल्याचं' म्हटलं तेव्हा त्याला उत्तर देताना 'मला वाईट वाटतंय की मला याबद्दल काहीही कल्पना नव्हती, पण मी खुश आहे कारण यापूर्वी अनुष्काला मी एवढं आनंदी आणि सुंदर कधीही पाहिलं नव्हतं' असं रणबीरनं म्हटलंय. 




याच वेळी आपण सध्या आपल्या आगामी 'ब्रह्मास्र'च्या तयारीत असल्याचंही सूतोवाच रणबीरनं केलंय. नुकतंच रणबीरनं संजय दत्तची बायोपिक असलेल्या सिनेमाचं शुटिंग संपवलंय.