मुंबई : झगमगत्या विश्वात दोन अभिनेत्रींमध्ये घट्ट मैत्री असणं फार कठीण आहे. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी जेव्हा करियरची सुरूवात केली, तेव्हा त्यांच्या मैत्रीचे किस्से कायम रंगायचे. दोघी एकत्र वर्ल्ड टूरसाठी देखील गेल्या होत्या. पण तो एक दिवस आणि दोन्ही अभिनेत्रींमध्ये असलेली मैत्री संपली. ही मैत्री तुटण्यामागे अनेक किस्से प्रसिद्ध झाले, त्यातील एक म्हणजे शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा 'चलते चलते' सिनेमा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात राणीच्या आधी ऐश्वर्याला कास्ट करण्यात आलं होतं, मात्र शूटिंगदरम्यान सलमान खानने असा राडा केला की, निर्मात्यांना ऐश्वर्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर सिनेमा राणीला मिळाला. या घटनेनंतर राणी आणि ऐश्वर्याच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता.


तर दुसरीकडे, एक काळ होता जेव्हा अभिनेता अभिषेक बच्चनसोबत राणीच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या.  पण अभिषेकने ऐश्वर्यासोबत लग्न केलं. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नात राणीला निमंत्रण देखील दिलं नव्हतं. 


राणी आणि अभिषेकच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 'बंटी और बबली', 'युवा', 'बस इतना सा ख्वाब है', 'कभी अलविदा न कहना' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र स्क्रिन शेअर केली.