मुंबई : डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ज्याने लोकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. त्याचबरोबर लोकं याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अशी बातमी आहे की, पुष्पा 2 मध्ये रश्मिका मंदान्ना म्हणजेच श्रीवल्लीचं पात्र मरण पावणार आहे. ज्यावर आता चित्रपटाचे निर्माते वाय रविशंकर बोलले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीवल्लीचा होणार मृत्यू
एका मुलाखतीमध्ये बोलताना पुष्पाचे निर्माते वाय रविशंकर 'पुष्पा 2'मध्ये श्रीवल्ली खरोखरच मरण पावेल का याबद्दल म्हणाले. 'हा सगळा मूर्खपणाच आहे, हे सगळं केवळ एक अनुमान आहे कारण आतापर्यंत आपण कथा ऐकली आहे. ही गोष्ट अनेक वेबसाईट्स आणि टीव्ही चॅनेल दाखवत आहेत. पण कुणालाही याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे ते त्यावर विश्वास ठेवतात. पण ही अफवा आहे. त्याचबरोबर, ते म्हणाले की, पुष्पा 2 मध्ये श्रीवल्लीचं पात्र नक्कीच असेल.


या महिन्यात चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे
त्याचबरोबर वाय रविशंकर यांनी हेही सांगितलं की,  पुष्पा 2 चं शूटिंग कधी सुरू होणार आहे. तो म्हणाला, 'सध्या चित्रपटाची तयारी सुरू असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.'