Renuka Swamy Murder Pavithra Gowda Daughter Khushi : कन्नड चित्रपटसृष्टीतील दोन मोठे कलाकार दर्शन थूगुदीप आणि पवित्रा गौडा काही काळापासून हत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्या दोघांना काही दिवसांपूर्वी कन्नड पोलिसांनी रेणुका स्वामीच्या हत्ये प्रकरणात अटक केली. सध्या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. नुकतीच पवित्रा गौडाची मुलगी खुशी गौडानं तिच्या आईच्या अटकेच्या काही दिवसांनंतर मौन सोडलं आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या सगळ्यात खुशीनं रविवारी ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये खुशी तिच्या आईसोबत म्हणजे पवित्रा गौडासोबत दिसत आहे. हा खास फोटो शेअर करत खुशीनं कॅप्शन दिलं की 'फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझं सगळं काही आहेस.' 



पवित्रा आणि दर्शनसोबत आणखी 13 लोकांना अटक केली आहे. शवविच्छेदन रिपोर्टनुसार, रेणुकास्वामीचं निधन जास्त प्रमाणात रक्तस्त्राव आणि शॉकमुळे झालं आहे. त्याच्या शरीरावर 15 जखमांच्या खुणा मिळाल्या, रेणुकास्वामीनं कथितपणे पवित्रा गौडाला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले होते, ज्यानंतर दर्शननं त्याला चित्रदुर्ग ते बंगळुरु बोलावलं. त्यानंतर त्याचं अपहरण करुन मग त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पार्थीवाला जवळच्या नाल्यात फेकण्यात आले. याविषयी तेव्हा कळलं जेव्हा श्वान हे पार्थिवाला कुरतडत होते. कथितपणे दर्शन आणि पवित्रानं केलेल्या या हत्ये प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. 


हेही वाचा : 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला


दर्शन आणि पवित्राला 11 जून रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दर्शनच्या मुलाला म्हणजेच विनीश थुगूदीपाला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्या सगळ्या ट्रोलिंगला कंटाळून विनीथनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. या पोस्टमध्ये विनीश म्हणाला होता की 'माझ्या वडिलांविषयी तुम्ही जे काही वाईट कमेंट केल्या आणि त्याशिवाय आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभर. मी एक 15 वर्षांचा मुलगा आहे आणि मला देखील भावना आहेत हे तुम्ही समजून घेतलं नाही यासाठी धन्यवाद. या कठीण काळा दरम्यान, जेव्हा माझ्या आई आणि वडिलांना पाठिंब्याची गरज आहे तेव्हा मला काही बोलून काही फरक पडणार नाही.'