Nana Patekar Rishi Kapoor: बॉलिवूडमध्ये मैत्रीचे किस्से व्हायरल होताना दिसतात. त्यातून एकमेकांसोबत काम करतानाचेही अनेक किस्से व्हायरल होतात. कधी कलाकार एकमेकांवर टीका करतात तर एकमेकांचे भरभरून कौतुकही करतात. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. त्यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 2022 साली विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावरूनही प्रचंड गदारोळ माजला होता. त्यातून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. आता त्यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटही गाजतो आहे. या चित्रपटातून पल्लवी जोशी, नाना पाटेकर, गिरीजा ओक आणि अनेक दिग्गज कलाकार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या निमित्तानं झालेल्या पत्रकार परिषदेतून नाना पाटेकर यांनी अनेक खुलासे केले आहे. त्यांनी बॉलिवूडच्या घराणेशाहीवरही रोखठोक भाष्य केले होते. त्याची बरीच चर्चा होती. दूसरीकडे 2008 पासून तनुश्री दत्ता ही नाना पाटकेर यांच्यावर वेळोवेळी टीका करताना दिसते आहे. दहा वर्षांनंतरही तिनं मीटूच्या चळवळीच्या माध्यमातून नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले आहे. काही दिवसांपासून राखी सावंत विरोधात तनुश्री दत्ता आणि आदिल खान एकत्र आले होते. बरेच दिवस आदिल खान आणि राखी सावंत यांच्यात शीतयुद्ध सुरूच होते त्यातून राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांनीही एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत. यावेळी तनुश्री दत्ता हिनं पत्रकार परिषदेत पुन्हा नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले आहेत. 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटातून नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला बऱ्याच दिवसांनी आले आहेत. तो मुद्दा उचलून तनुश्रीनं टीका केली. 


हेही वाचा : रजनीकांत यांच्याकडून 'चंद्रमुखी 2'चं कौतुक; कंगनाला डावललं? पाहा ते काय म्हणाले...


सध्या नाना पाटेकर यांची जोरात चर्चा रंगलेली असताना आता त्यांच्यासोबत ऋषी कपूर यांचीही चर्चा रंगलेली आहे. सध्या जोरात चर्चा आहे ती म्हणजे ऋषी कपूर आणि नाना पाटेकर यांच्या काही किस्स्यांची. 


आपल्या ऋषी कपूर यांच्याशी असलेल्या मैत्रीविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रभात खबरला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, ''ऋषी कपूर हे खूपच छान व्यक्तिमत्त्व होतं. ते माझ्या घरीही येयाचे. एकदा ते माझ्या घरी दारूची बाटली घेऊन आले आणि मला म्हणाले की मला खात्री आहे की तुझ्याकडे दारूची बाटली नसेलच. त्या दिवशी मी खीमा आणि रोटी तयार केली. तेव्हा त्यांच्या सोबत नीतू कपूर नव्हत्या.''


पुढे ते म्हणाले की, ''मी नीतू यांना सांगितले की अजिबात घरी येऊ नकोस. मग ती घरी आली आणि आम्ही एकत्र जेवलो. मला ऋषी कपूर असंही म्हणाले की, तू साधारण अभिनेता आहेस. पण उत्तम जेवण करतोस. मी तुझ्यासाठी रेस्त्तो उघडतो.'' ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना नाना पाटेकरांच्या पुढे अनेक आठवणी दाटून आल्या. ते म्हणाले की, ''मी त्यांना फार कमी भेटलो परंतु ते माझे खूप चांगले मित्र होते. मी आज त्यांना मिस करतो.''