मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगना राणौतला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. 'मुंबई हिंदुस्तान है' असे त्याने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईची अवस्था पाकव्याप्त काश्मीरसारखी का झालेय- कंगना राणौत



कंगनाने गुरुवारी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई शहराविषयी टिप्पणी केली होती. तिने म्हटले होते की, शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे, असा सवाल यावेळी कंगनाने उपस्थित केला होता.



 


कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम

मात्र, कंगनाचे हे वक्तव्य आता तिच्यावरच उलटताना दिसत आहे. सोशल मीडियावर कंगना, संजय राऊत आणि मुंबई विषय ट्रेंड होताना दिसत आहेत. त्यामुळे आता कंगना राणौत यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.