Salman Khan Aishwarya Rai Bachchan Affair : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानला (salman khan in pathan)  पठाण (pathan) सिनेमात पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला. नुकताच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (kisi ka bhai kisi ki jaan) या सिनेमाचा टिझर (kisi ka bhai kisi ki jaan teaser) रिलिज झाला. प्रेक्षकांनीही या टीझरला भरभरुन दाद दिली. आता सगळे या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 
सलमान खानचे सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आजही सलमान खानच्या चाहत्यांची कमी नाही आहे. वयाच्या 58 व्या वर्षीसुद्धा सलमान खानची क्रेझ बॉलिवूडमध्ये पाहायला मिळते. पण इतकं असूनही हा अभिनेता आजही सिंगल आयुष्य जगतोय. एक काळ होता जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेयरच्या चर्चानी (Salman Khan Aishwarya Rai Bachchan Affair) जोर धरला होता. दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या. दोघांची जोडीसुद्धा प्रेक्षकांना फार आवडू लागली होती. पण, जे व्हायचं होतं ते झालंच. सलमान खान पुन्हा एकटा पडला. यापूर्वी देखील सलमान त्याच्या अफेयर्सच्या नेहमीच चर्चेत होता. माजी मिस वर्ल्ड आणि सध्याची बच्चन कुटुंबीयांच्या  सूनबाई अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबतचं अफेयरची तर सर्वाधिक चर्चा झाली होती. (salman khan aishwarya rai bachchan affair)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण


ऐश्वर्या आणि सलमान खान (salman khan) यांचं प्रेमप्रकरण हा आजही रंजकतेने वाचला जाणारा विषय आहे. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे असे वेगळे झाले, की आज एकमेकांचं तोंड पाहणंसुद्धा पसंत करत नाहीत. 


दरम्यान, बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमप्रकरणं झाली. त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं पण आज ते एकमेकांचे फ्रेंड्स म्हणून वावरत आहेत. मग सर्वाना हा प्रश्न पडतो, की नेमकं असं काय झालं असावं, की ऐश्वर्या आणि सलमान आज असे जगताहेत. ( salman aishwarya brekup story that night what happened )


सन 1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम'  (hum dil de chuke sanam) रिलीज झाला चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतलं होतं. सलमान आणि ऐश्वर्याची जोडी सर्वाना आवडली होती. खऱ्या आयुष्यात सुद्धा दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागला होता. दोघांचं प्रेम फुलू लागलं होतं जवळपास तीन वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. पण अचानक एका रात्रीत असं काही घडलं की दोघांचं आयुष्यच बदलून गेलं. 


दोघेही लग्न करणार अशा खूप बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या आणि अचानक ऐश्वर्याच्या स्टेटमेंटने (Aishwarya statment against salman) अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमान आपल्याला मारहाण करतो असं स्टेटमेंट ऐश्वर्याने मीडियासमोर दिलं आणि एकच खळबळ उडाली होती. ( AishwaryaRai birthday: salman aishwarya brekup story that night what happened )


नेमकं काय घडलं त्या रात्री


असं म्हटलं जात की, त्या रात्री सलमान खान खूप दारू प्यायला होता. मद्यधुंद अवस्थेत तो ऐश्वर्याच्या घरी पोहोचला होता. सलमानने ऐश्वर्याच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारल्या होत्या. तुफान राडा देखील केला होता. त्यावेळी सलमानच्या हाताला गंभीर दुखापत देखील झाली होती. घराचा दरवाजा उघडला नाही तर जीव देईल, असंही तो बडबडत  होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. बराच वेळ हा हायव्होल्टेज (Highvolteage drama) सुरु होता. ( salman aishwarya brekup story that night what happened)