Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काल 19 डिसेंबर रोजी तो त्याचा भाऊ सोहेल खानचा वाढदिवस साजरा करताना दिसला. त्यावेळी पार्टीत सलमान खान हा त्याच्या आई-वडिलांसोबत बाहेर येताना दिसला. त्यानंतर त्यानं त्या दोघांना गाडीजवळ ड्रॉप केले. पण या सगळ्यात पापाराझींवर तो अचनाक चिडला. त्यावेळी नेमकं काय झालं आणि सलमान खान का चिडला हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर फिल्मी ग्याननं शेअर केला आहे. सोहेलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटूंब एकत्र आल्याचे पाहायला मिळते. सलीम खान, हेलेन, सलमान खान, अर्पिता खान आणि आयुष शर्मा, अलवीरा खान, अतुल अग्निहोत्री आणि त्यांची लेक अलिजेह आणि काही जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती. या पार्टीतून सलमान त्याच्या आई-वडिलांना सोडायला बाहेर निघाला आणि गाडीत जाऊन बसला. या दरम्यान, फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी पापाराझी हे गाडी जवळ आले.  अचानक इतके फोटोग्राफर्स गाडी जवळ आल्याचे पाहून सलमान संतापला आणि त्यांच्यावर चिडला. त्यामुळे गाडीत बसण्यासाठी जात असलेला सलमान आधी पापाराझींवर चिडत म्हणाला, सगळे मागे सरका. त्यानंतर सलमानचे बाऊंसर्स फोटोग्राफर्सला मागे ढकलताना दिसले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान खानच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'टायगरला असा त्रास देऊ नका.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'अरे तो आईला गाडीत बसवतोय आणि हे सगळे काय करतायत.' 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोनीनं दिलेल्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली होती. खरंतर ती धमकी लॉरेंस बिश्नोईकडून आली होती की नाही ही समोर आलेलं नाही. मात्र, ज्या फेसबूक अकाऊंटवरून ही धमकी आली होती त्याच्या फेसबूक प्रोफाईल पिक्चरमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा फोटो होता. 


हेही वाचा : सैफ अली खानसोबत झालं 'मोए-मोए'; दुसऱ्या महिलेला करीना समजून केलं हे कृत्य


सलमान खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सध्या टायगर 3 या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसत आहे. तर इमरान हाश्मी हा या चित्रपटाच खलनायकाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले तर आदित्य चोप्रानं या चित्रपटाची निर्मिती केली.