मुंबई : बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत असे अनेक सत्य आहेत, जे अद्याप त्यांच्या चाहत्यांना माहिती नाहीत. बॉलिवूड स्टार कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्तेत असतात. कधी चित्रपटांमुळे कधी अफेअर्समुळे तर कधी मैत्री आणि शत्रूत्वामुळे. अभिनेता अभिषेक बच्चनच्या जीनवात देखील काही शत्रू आहेत. ज्यांचं अभिषेक तोंडही पाहात नाही. यामध्ये फक्त सलमान खान नाही तर अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खान (Salman Khan)
 एक काळ होता जेव्हा अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सलमान खानने ऐश्वर्याला मारहाण केल्याचे सांगितलं जातं. यामुळेच अभिषेकला सलमान खान काही आवडत नाही.


अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi)
विवेक आणि  ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते. ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर अभिषेक बच्चनने विवेकसोबत कोणतेही नाते ठेवले नाही.


अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)
'धूम 2.0' सिनेमात हृतिक आणि ऐश्वर्याने एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमात हृतिक आणि ऐश्वर्याचे किसिंग सीन होते. ज्यावर अभिषेकने नाराजी व्यक्त केली.  आता दोघे एकमेकांसोबत बोलत नाही. 


अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)
करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यात चित्रीत केलेले रोमँटिक सीन अभिषेक बच्चनला आवडले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, तेव्हापासून अभिषेक रणबीर कपूरसोबत फारसा संपर्कात नाही.