मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर सिनेमा बनणार आहे. 'संजू' सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रणबीर कपूरला मुख्य भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दर्शकांमध्ये सिनेमाबाबत उत्सूकता आहे. रणबीरचा अभिनय देखील खूप चर्चेत आहे. लूक, बोलण्याची स्टाईल याबाबतीत रणबीरचं कौतूक होतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य लोकांकडून कौतूक होतं असताना आता सलमान खानने देखील संजू सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. दबंग खान सध्या आगामी 'रेस 3' च्या प्रमोशनासाठी खूप व्यस्त आहे. पण यादरम्यान त्याने संजू सिनेमाबद्दल अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया दिली.


सलमानने म्हटलं की, मला हे कळालं नाही की ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्याला का दिली गेली नाही. संजय दत्तने जेलच्या बाहेरच्या सीननंतर स्वत: भूमिका करायला हवी होती. इतर कोणताही अभिनेता या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही. राजकुमार हिरानी खूपच अनुभव असणारे दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेमा चांगलाच बनवला असेल.


या सिनेमात रणबीरशिवाय परेश रावल, मनीषा कोयराला, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दीया मिर्जा आणि बोमन ईरानी या सारखे कलाकारा मुख्य भूमिकेत आहेत. 29 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.