मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याने नक्की आत्महत्या का केली. याच शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र त्याच्या आत्महत्ये मागचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. आता याप्रकरणाची चौकशी बिहार पोलीस देखील करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये रिया विरोधात अनेक आरोप केले आहेत. मात्र रियाने तिच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढचं नाही तर आता सुशांतची तब्येत उत्तम असताना देखील रिया त्याला औषधं देत असलेल्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 


याबाबतीत सुशांतच्या औषधांबद्दल ट्रेनर समी अहमदने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला, 'मी खरं सांगत आहे, याबद्दल मला काहीच माहित नाही. पण हा सुशांत औषधं मात्र नक्की घ्यायचा.' त्यामुळे सुशांत कोणती औषधं घेत होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत असताना महाराष्ट्र सरकारने या चौकशीस नकार दिला आहे.