मुंबई : अभिनेता संजय दत्तनं एकाच वेळी पॅरोल आणि फरलो अर्ज केल्यानंतर त्याला दोन्ही एकाच वेळी दोन्ही अर्ज मंजूर कसे काय करण्यात आले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्त येरवडा तुरुंगात शरण आल्यानंतर दोन महिन्यातच त्याचं वर्तन चांगलं होतं हे कसं काय कळलं, हे कळण्याचे निकष काय होते, ते आम्हाला तरी कळू द्या असंही न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलंय. या गोष्टींचा खुलासा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.


बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या अडचणी पुन्हा वाढण्याच्या शक्यता आहेत. संजय दत्तच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडतांना म्हटलं की, कोर्टाला जर वाटतं की संजय दत्तला नियमांकडे दुर्लक्ष करुन सोडण्यात आलं आहे तर त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यास सरकार तयार आहे.