मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीव ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सायलीला खरी ओळख ही 'काहे दिया परदेस' या  मालिकेतून मिळाली. सायलीनं आता पर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच सायली 'हर हर महादेव' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सायली आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाड रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, आता सायलीनं तिच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायलीनं नुकतीच झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. सायलीसोबत यावेळी अभिनेता शरद केळकरनेही हजेरी लावली होती. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी सायलीलला ऋतुराजविषयी प्रश्न विचारला. सायली काही बोलण्याआधीच शरद तिची गंमत करत म्हणाला, ‘जर तो तुझा मित्र असेल तर प्लीझ मला त्याच्याकडून एक बॅट हवी हा… माझ्यासाठी एक बॅट मागून घे.’ त्यावर उत्तर देत सायली म्हणाली, ‘मी तुम्हाला बॅट त्याच्याकडून देऊ शकते.’ 


पुढे स्पष्टीकरण देत सायली म्हणाली, 'तो आणि मी खूप चांगले मित्र आहोत. खरं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आहे. हे सर्वजण माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत. त्यांना माझी 'काहे दिया परदेस' ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे. मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा थक्कच झाले. क्रिकेटपटू ही मालिका का बघतात हेच मला कळत नव्हतं. एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत.' (Sayali Sanjeev Talks About Ruturaj Gaikwad And Her Relationship Rumors) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सायली आणि ऋतुराजच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत. ऋतुराजनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आलं होतं.