मुंबई : तारक मेहता सीरियलला नुकतीच 14 वर्ष पूर्ण झाली. या सीरियमधील लोकप्रिय दुसरी भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने मालिका सोडणार अशी चर्चा आहे. याबाबत अभिनेता किंवा तारक मेहताच्या टीममधील कोणीच अजून तरी याबाबत वक्तव्य केलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहता सीरियल सोडण्याच्या तयारीत आहेत. शैलेशने मालिका सोडण्यामागे निर्माता असित मोदी यांचा एक करार असल्याची माहिती मिळाली आहे. करारानुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे कलाकार जोपर्यंत शो करत आहेत तोपर्यंत ते दुसरे कोणतेही काम करू शकत नाहीत. 


जरी ते महिन्याचे 17 दिवस मोकळे असले तरीही. याच कारणामुळे अनेक कलाकार या शोवरून नाखूश असल्याची चर्चा होती. त्यामुळे काही कलाकरांनी यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शैलेश या शोमध्ये केवळ 15 दिवस शूटिंग करायचा. उर्वरित वेळेत त्याला कवितेचे शो करण्यासाठी द्यायचे होते. मात्र करारामुळे त्याला करता येत नव्हतं. 


बऱ्याचदा मनधरणी करूनही निर्माता तयार होत नसल्याने अखेर त्यांनी तारक मेहता सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.निर्मात्याच्या म्हणण्यानुसार एकसाठी सगळ्या कलाकारांसोबतचे करार बदलावे लागतील हे त्यांनी चालणारं नव्हतं. त्यामुळे निर्मात्याने त्यांना परवानगी दिली नाही. याबाबत शैलेश यांनी कोणतंही अजून जाहीर निवेदन दिलं नाही. 



शैलेशच्या आधी  राज अनादकट यांनी देखील याच कारणामुळे मालिका सोडल्याची चर्चा होती. यावर आता शैलेश कधी बोलणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.