मुंबई : सध्या ममनोरंजन सृष्टीत काही कपल लग्नबंधनात अडकतायेत तर काही मात्र एकमेकांसोबत घटस्फोट घेतायेत. कलाकारांच्या घटस्फोटोच्या बातम्या सतत कानावर येत असतात. या बातम्या ऐकून त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतं. 'कालपरवा पर्यंत  सगळं गोड असलेलं कपल अचानक त्यांच्या नात्यात बिघडतं तरी काय?' असे प्रश्न प्रत्येक सामान्य चाहत्याला सतावू लागतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाया खालची जमिन सरकेल एवढं मात्र नक्की! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बोलत आहोत सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवबद्दल. होय! सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती जाधव यांच्यात काहितरी बिनसलयं अशी बातमी समोर येत आहे.  सिद्धार्थ जाधवच्या जवळच्या माहितीतील सूत्रांनुसार, गेले दोन वर्ष सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यात खटके उडत होते. गेल्या काही दिवसांपासून ते एकत्रही राहत नाहीयेत. त्याच्या दोन मुली त्याच्या पत्नीसोबत राहत आहेत. दोघांमधलं वादाचं कारण मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलयं. 


दोघंही वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. असं सूत्रांनी सांगितलं आहे. काहि दिवसांपुर्वी हे कपल दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले होते. पण दोघांचं इन्स्टा चेक केलं असता दुबईतील पोस्ट केलेल्या फोटोत दोघांचा एकमेकांसोबतचा एकही फोटो दिसत नाहीये. आजकाल अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले तरी मुलांसाठी एकत्र डिनरला जातात,हॉलिडेवर देखील जातात. तसंच,सिद्धार्थ आणि तृप्ती मुलींना घेऊन दुबईत गेले आहेत असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. पण यावंर सिद्धार्थ आणि तृप्तीने काहीच वक्तव्य केलेलं नाहीये. त्यामुळे या दोघांचं नात बिनसलं आहे की, या अफवा आहेत हे आपल्याला येणारा काळच सांगले. 


2007 मध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती लग्नबंधनात अडकले. या दोघांच लव्हमॅरेज आहे. 'नच बलिये' मध्ये दोघांनी घेतलेल्या सहभागानंतर त्यांच्यातील लव्ह बॉन्ड चाहत्यांपर्यंत पोहोचलं होतं.