मुंबई :  सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकरणानंतर आता आम्ही तुमच्यासाठी एक हलकी-फुलकी बातमी घेवून आलो आहोत. मनोरंजन क्षेत्रातल्या या बातमीने आता एकच चर्चा सुरु झाली. ही चर्चा आहे गायिका वैशाली सामंतची. आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरु आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवं प्रकरण! तर आम्ही तुम्हाला सांगतो खरच वैशाली सामंतची लगीन घाई सुरुये. पण ती कशी ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई 'कन्याकुमारी'च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत 'कन्याकुमारी' या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.



मंदार चोळकर व मिताली जोशी यांनी लिहिलेल्या या गीताला वैशाली सामंत हिने आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले असून चिनार-महेश यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले असून अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं आहे.