मुंबई : बॉलीवूडच्या या झगमगत्या दुनियेतली अनेक कपल कायम चर्चेत असतात. इतकंच नाही तर काही स्टार्स असे आहेत ज्यांनी एक-दोन नव्हे तर अनेकवेळा लग्न केलं आहे. मग ते बॉलिवूड अभिनेते किशोर कुमार असो वा आमिर खान. पण आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत जे 40 ते 50 च्या वर असूनही सिंगल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचं. त्याचे चाहते देखील त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत.



बॉलिवूड अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आणि सुप्रसिद्ध अभिनेता तुषार कपूर यानेही लग्न केलं नाही.



दिग्गज कलाकारांच्या या यादीत बॉलीवूड अभिनेता अक्षया खन्नाच्या नावाचाही समावेश आहे. अक्षय खन्ना अजूनही बॅचलर आहे.



बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने अद्याप लग्न केलेलं नाही. सरोगसीच्या मदतीने करण हा दोन मुलांचे वडील आहेत.



'धूम' स्टार उदय चोप्राचं वय पन्नाशीच्या जवळपास आहे. पण या वयातही तो बॅचलर आहे.