मुंबई : बॉलीवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांनाच झटका बसला. श्रीदेवींचे दुबईत २४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जशी श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण समोर आले तसे अनेकांनी कयास लावणे सुरु केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता श्रीदेवीचे काका वेणुगोपाल यांनी तेलुगु न्यूज चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आरोप केलाय की श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण बोनी कपूर आहेत. 


काही सिनेमे फ्लॉप गेल्यामुळे तोटा झाल्याने बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या नावावर असलेल्या अनेक संपत्ती विकून टाकल्या. याचे दु:ख श्रीदेवीला नेहमी सलत असेच. आपल्या हसऱ्या चेहऱ्यामुळे हे दु:ख श्रीदेवी लपवून ठेवत असे, असे वेणुगोपाल म्हणाले.


ते पुढे म्हणाले, बोनी कपूर यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्या कारणाने श्रीदेवीला पुन्हा काम सुरु करावे लागले होते. 


श्रीदेवींचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर सिनेनिर्माता राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या मृत्यूवर सवाल उपस्थित केला होता. वर्माने याबाबतचे एक पत्र लिहिले होते.