मुंबई : एक असं शहर आहे, जिथे अनेकांच्या स्वप्नांना बळ मिळालं. स्वप्न पूर्ण करत असताना, काहींना लवकर यशाच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला. पण काहींना मात्र कष्ट करून देखील पदरी अपयश आलं. यश-अपयशाची पयरी चढताना एक अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीस आली तिचं नाव आहे अभिनेत्री सुरभी ज्योती. सुरभीने 'कबूल है' मालिकेत झोया म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन  केलं, तर 'नागीन' मालिकेतून आपल्या सौंदर्याची सर्वांवर भुरळ पाडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही मालिकांमधून करियरची सुरूवात करणाऱ्या सुरभीने फार कमी वयात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे नशीबाची साथ असल्यामुळे तिचं स्वप्न लवकर पूर्ण झालं. पण प्रवासात निंदा करणारे देखील अनेक जण तिच्या वाट्याला आले. 


एका मुलाखतीत सुरभीने याबद्दल सांगितलं, 'आपलं यश आपल्या जवळच्या लोकांना पचत नाही. कमी रुपयांमध्ये मुलगी उचलून आणली आहे... असं देखील अनेक जण सुरभीला म्हणाले...' पण लोकांचा विचार न करता सुरभीने स्वतःवर विश्वास कमी न पडू देता जोमाने काम केलं. 



सुरभी पुढे म्हणते, 'मी अशा लोकांपासून दूर राहते, जे कायम निंदा करत असतात. मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं, कारण तो फक्त त्यांचा राग काढत असतात. मी यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तर आतापर्यंतची माझी कारकीर्द चांगली आहे. '


सुरभीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ' 'कुबूल है', 'कुबूल है 2.0' आणि 'नागिन 3' व्यतिरिक्त, सुरभीने 'प्यार तूने क्या किया' चे तीन सीझन होस्ट केले आहेत. याशिवाय सुरभीने अनेक म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या समोर आली.