मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा स्मॉल स्क्रिनवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जो केवळ भारतातच नाही तर जगात जिथे भारतीय राहत आहेत. तेथे लोकांना खळखळून हसवत आहे. इतक्या वर्षांनंतरही या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहता का उल्टा चष्मा शो सध्या खूप कठीण टप्प्यातून जात आहे. कारण हा शो थांबला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत शो बंद होऊ शकतो. असं बोललं जात आहे की या सोवर संकटांचे ढग दाटून आले आहेत, त्यामुळे शोचा टीआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे. 


तारक मेहता शोमधील प्रत्येक पात्र हे महत्त्वाचं आहे. त्यात जेठालालचं पात्र सगळ्यांनाच खूप आवडतं. नुकतीच बातमी समोर आली होती की जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र या शोची चर्चा सुरु होती. 


दया बेन पाठोपाठ जेठालाल देखील शो सोडणार अशी माहिती समोर आल्याने हा शो बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण दिलीप जोशी यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया देत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.


पण त्यानंतर अभिनेते दिलीप जोशी म्हणाले की, ज्या दिवशी त्यांना शोमध्ये काम केल्याचा आनंद मिळणार नाही, किंवा शोची स्क्रिप्ट आवडणार नाही. तेव्हा ते शो सोडून देतील. पण सध्या समोर आलेली माहिती योग्य नाही.