मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दिलीप जोशी म्हणजेच मालिकेतील जेठालाल आणि शैलेश लोढा म्हणजे तारक मेहता यांच्यामध्ये सेटवर वाद झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता शैलेश यांनी यावर वक्तव्य केले आहे. शैलेश यांनी पसरत असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमच्यातील मैत्री अत्यंत चांगली आहे आणि आमचं नातं कायम असचं राहो... असं शैलेश म्हणाले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैलेश यांनी ‘दैनिक भास्कर’ला नुकतीच मुलाखत दिली.  त्यावेळी त्यांनी दिलीप जोशी यांच्या सोबत कोणत्याही  प्रकारचे वाद नाहीत असं सांगितलं आहे. त्यांच्यामध्ये खऱ्याखुऱ्या आयुष्याच चांगले मैत्रीचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाया सेटवर दोघांना बेस्ट बडी म्हणून हाक मारतात. शैलेश यांच्या वक्तव्यामुळे मालिकेच्या सेट कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचे स्पष्ट झालं आहे. 


शैलेश म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र काम करत आहोत. पण आमच्यात कधी वाद झाले नाहीत. मी देवाकडे प्रार्थना करतो की आमचे नाते कायम असेच राहो....'