मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी स्वत:ला अयशस्वी अभिनेत्री मानते. दिशाने आतापर्यंत 'कुंग फू कराटे', 'बागी २', 'भारत' यांसारखे एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका बजावली आहे. करिअरच्या योग्य मार्गावर असणारी दिशा मात्र स्वत:ला अयशस्वी अभिनेत्री मानते. दिशाला यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे मला आणखी खूप मेहनत कराण्याची गरज आहे असं दिशा म्हणते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दिशा म्हणते ,'आजूनही खूप मेहनत करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की माझ्या आता पर्यंतच्या प्रवासात मला अत्यंत चांगले लोक भेटले आहेत. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजते. माझ्या कुटुंबाकडून मला अभिनयाबद्दल कोणत्याच प्रकारचा सल्ला मिळत नाही, आणि मी त्यांच्यावर दबाव देखील टाकत नाही. मी आनंदी आहे माझ्याकडे अनेक चित्रपटं आहेत. त्यामध्ये मी माझं बेस्ट देण्याच्या प्रयत्नात आहे.' त्याचप्रमाणे तिने यावेळेस तिच्या आई-वडिलांचे आभार मानले. 



अभिनय क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी दिशाच्या आई-वडिलांनी कायम तिला पाठिंबा दिला. या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी मला प्रेरित केले. पण मी सध्या स्वत:ला अयशस्वी मानते. यश मिळवण्यासाठी फार मेहनत करायची आहे. असं वक्तव्य दिशाने केलं. 


तर, दिशा लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर 'राधे' चित्रपटात झळकणार आहे. 'राधे' चित्रपटात दिशा आणि सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यंदाच्या वर्षी हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'राधे' चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या 'वान्टेड' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 


'राधे' चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री दिशा पटनी देखील भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभू देवा यांच्या खांद्यावर आहे. 'दबंग ३' चित्रपटानंतर हे त्रिकूट पुन्हा 'राधे' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे.