मुंबई : 'झी मराठी' वरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला कायमच उतरतात. मात्र आता एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून नंबर १ होती. मात्र आता ती प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. स्वीटू आणि ओमची लव्हस्टोरी ही प्रेक्षकांच्या पसंतीला चांगलीच पडली होती. 



सततचे ट्वीस्ट आणि टर्नमुळे मालिका सोशल मीडियावर चर्चेत असते. शिवाय अनेकवेळा मालिका यामुळे ट्रोल देखील झाली आहे. आता लवकरच ही मालिका बंद होऊन या जागी नवीन मालिका सुरू होणार आहे.



'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार चिन्या आणि किंजलच्या लग्नाने मालिकेचा शेवट होणार आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड होणार आहे एवढे न क्की आहे.


'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या जागेवर 'तू तेव्हा तशी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.