मुंबई : 'झी मराठी'वरील सर्वात लोकप्रिय असणारी मालिका 'तुझ्यात जीव रंगला' लवकरच निरोप घेणार असल्याची शक्यता आहे. मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजली पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर यांच्या भूमिका विेशेष गाजल्या आहेत. ही जोडी घराघरात पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. रांगडा गडी 'राणादा' आणि प्रेमळ अंजलीबाई हे दोघे प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. परंतु, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या जागी (वेळेत) आता 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही मालिका प्रदर्शित होणार आहे. याचा प्रोमो 'झी मराठी'वर दाखविण्यात येत आहे.



दरम्यान, परदेशात नोकरीनिमित्त गेलेला मुलगा आपल्या गावच्या घरी येतो. त्यावेळी तो कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीची भेटवस्तू आणतो. मात्र स्वत:ला काहीही आणत नाही. त्यावेळी त्याला तुला काय, असा प्रश्न केला जातो. त्यावेळी तो म्हणतो 'डॉल'. त्यावेळी कुटुंबातील सदस्य म्हणतात यावयात बाहुलीशी घेळणार का? तेव्हा परदेशी मुलीची घरात एन्ट्री होते आणि कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसतो. असा प्रोमो दाखविण्यात येत आहे. हा प्रोमो संपल्यावर ही मालिका येत्या २१ ऑक्टोबर २०१९ पासून रात्री ७.३० वाजता 'झी मराठी'वर प्रक्षेपित होणार असल्याचे सांगितले जाते. यावरुन 'तुझ्यात जीव रंगला' ही निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.