नवी दिल्ली :  बॉलीवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली ट्विंकल खन्ना सध्या लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे.  अलीकडे अक्षय कुमार आणि मल्लिका दुआ यांचया झालेल्या वादानंतर केलेल्या विधानानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. यानंतर झालेल्या वादविवादानंतर ट्विंकलने माफी मागत आपले शब्द मागे घेतले आहेत. तसेच नितारा या आपल्या मुलीलाही ट्रोल केल्याबद्दल राग व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेवर विचार केला असता मला यात अडकविले गेल्याचे तिने सांगितले. या घटनेत मला एक लेखिका म्हणून न पाहता पत्नीच्या नजरेतून पाहिले गेले. त्या घटनेवरचे माझे रिअॅक्शन भावनिक होते. पण कारण नसताना माझ्या मुलीला यात अडकविले गेल्याने मी लिहिण्यापासून स्वत: ला रोखू शकली नसल्याचे ट्विंकलने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यापूढे लिहिताना मी विचार करुन प्रतिक्रीया देईन असेही ती म्हणाली. 



काय आहे प्रकरण ?


हा वाद 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' पासून सुरु झाला होता. यामध्ये या शो मध्ये एक घंटी आहे जी चांगल्या परफॉर्मेंसवर वाजविली जाते. मोदींची मिमिक्री करणाऱ्या स्पर्धकासाठी मल्लिका दुआ घंटा वाजवायला जात असताना तू ही बेल वाजव, मी तुला वाजवतो असे विधान केले होते. 


 हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मल्लिकाचे वडिल आणि वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी अक्षयला महामुर्ख म्हटले होते. त्यानंतर मल्लिकाने एक ब्लॉग लिहित अक्षयच्या मुलीला या वादात अडकविले होते. त्यानंतर ट्विंकलने यावर आपली बाजू मांडली होती.