मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. वरुण धवनही सध्या जुग जुग जियो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यादरम्यान तो त्याच्या फिल्मी करिअरसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलत आहे. वरुण धवनने आता लग्नानंतर त्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं आहे. अभिनेत्याने गेल्या वर्षी त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालशी लग्न केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर वरुण धवनचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. त्याची अवस्था अशी झाली आहे की, त्याने चुकून पत्नी नताशाची जीन्स घातली. वरुण धवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या बद्दल सांगितलं आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत.


लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना वरुण धवन म्हणाला, 'काय होतं की मुलींचे कपडे तुमच्या कपाटात येतात. मी चुकून जीन्स काढतो आणि घालायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला समजतं की ही नताशाची जीन्स आहे.


वरूण धवन पुढे म्हणाला, 'माझ्यासोबत असं बऱ्याचदा घडतं की, सगळे कपडे मिसळून जातात. हे साहजिकच आहे कारण तुम्ही तुमचं आयुष्य कोणाशी तरी शेअर करत असता. पण ते पूर्णपणे ठीक आहे. वरुण धवनच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर वरुण धवन व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे.