Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या स्टार सासू सुनांची जोडी कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या सासू सुना चर्चेत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे जया बच्चन यांची एक जुनी मुलखात जी आता पुन्हा व्हायरल होत आहे. या जुन्या मुलाखतीत जया यांनी रणबीर कपूरसोबत सून ऐश्वर्या राय बच्चनच्या इंटीमेट सीनवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली होती, हा सिन  2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटातील आहे. ज्यात ऐश्वर्या आणि रणबीर यांच्यावर चित्रित करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया या मुलाखतीत म्हणाल्या, "पूर्वी, चित्रपट निर्माते कलेची निर्मिती करत होते,आज तो केवळ एक व्यवसाय आहे आणि सर्व काही आकड्यांशी संबंधित आहे.  लोक कलेमधील सूक्ष्मता विसरले आहेत. शरम नावाची काही गोष्टच राहिली नाही आहे.”


जया यांचे हे विधान विधान 'ए दिल है मुश्कील'च्या रिलीजच्या वेळी समोर आले होते. त्यावेळी रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अमिताभ बच्चन यांनी देखील सून ऐश्वर्या राय बच्चनच्या 'ए दिल है मुश्कील'मधील तिच्या बोल्ड भूमिकेबद्दल ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर या सगळ्यात अभिषेकही नाराज झाल्याची चर्चा होती. 


ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन बोलत नाहीत?


अलीकडे, अशीदेखील  बातमी समोर आली होती ऐश्वर्या आणि जया या दोघांमध्ये काही ठीक नाही. या दोघीही  एकमेकांशी बोलत नाहीत आणि त्यांनी एकमेकांपासून अंतर राखले आहे. ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत वेगळ्या घरात राहते. शिवाय अलीकडेच रिलीज झालेलता 'द आर्चीज' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये जया बच्चन आणि ऐश्वर्या एकमेकांशी अंतर ठेवताना दिसल्या असं अनेकांनी म्हटलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी ही गोष्ट नोटीस केली आणि खात्री पटली की सासू आणि सूनेमध्ये सर्व काही ठीक नाही.


इतकंच नव्हे तर जया बच्चन यांनी आपली नात आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमात जाणेदेखील टाळले होते. जेथे अमिताभ बच्चन यांनी मात्र, त्यांची उपस्थिती दर्शविली होती. श्वेता बच्चन देखील या कार्यक्रमाचा भाग नव्हती आणि यामुळे बच्चन कुटुंबातील मतभेदांमुळे असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. 


हेही वाचा : फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी?


करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चननं सबा तालियार खान या कवीची भूमिका साकारली होती.