मुंबई : दिव्या भारती यांना सर्वात तरुण सुपरस्टार असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. एकापाठोपाठ एक हिट बॉलिवूड चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीचं वय कदाचित जास्त नसेलं, मात्र प्रत्येक बॉलिवूड प्रेमी त्यांच्या सौंदर्याच्या आजही प्रेमात आहे. एकेकाळी सुपरस्टार असलेल्या दिव्या भारती यांची जुनी इंटरेस्टिंग मुलाखत व्हायरल होत आहे. ही मुलाखत आमिर खान संबंधित आहे. ज्यामध्ये दिव्या भारती यांनी म्हटलं होते की, आमिर खानने सुपरस्टारसारखं नाही तर सिनीयरसारखं रहावं. दिव्या भारतीने सांगितले की, ''मी आमिरमुळे रडले आहे'', मात्र सलमानने माझी बाजू घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानसोबत झालं होतं भांडण
या मुलाखतीत दिव्या भारतीने आमिर खानच्या विरोधात बरंच काही सांगितलं आहे, तर दुसरीकडे सलमान खानचं जोरदार कौतुक केलं आहे. याचबरोबर त्यांनी आणि जूही चावला यांची स्पर्धा या बद्दलहा चर्चा केली आहे. 1992 मध्ये दिलेल्या मुलाखतीत दिव्या भारती या आमिर खानशी झालेल्या भांडणाबद्दल खुलेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, 'आमिर खानने माझ्यावर नाराज होऊ नये. उलट मी त्याच्यावर नाराज झालं पाहिजे'.


'माझ्याकडून झाली छोटी चूक''
''जेव्हा आपण थेट लाईव्ह शो  करता, तेव्हा जाहीर असतं की, आपल्याकडून काहीतरी छोटीशी चूक होणार आहे. आपण कदाचित चूक करू शकता. माझ्याकडून देखील चुक झाली होती, ती चूक ऐवढी छोटी होती की ती चूक कुणाच्याच लक्षात आली नाही. मी लगेच माझ्या परर्फोमंन्सने ती चूक कव्हर केली. मात्र आमिरला हे माहित होतं कारण त्याला परफॉर्मन्स देखील माहित होता. दुसर्‍या क्षणी मला सांगण्यात आलं की, त्याला नृत्यदिग्दर्शकच्या बहिणीबरोबर रिहर्सल करयाची आहे. मी आता काय बोलू?''


आमिरने सांगितलं मी खुप थकलो आहे
पण मला या कारणामुळे सगळ्यात जास्त वाईट वाटलं जेव्हा, मी आमिर खानला जूही चावलासोबत स्टेजवर परर्फोम देताना पाहिले. जुहीकडे आधीपासूनच बरेच परर्फोमेंस होते. शो दरम्यान, आमिरने माझ्याबरोबर करणार असलेल्या डान्स परर्फोमेंसमधूनही बाहेर पडला होता, आणि म्हणाला की, 'मी खूप थकलो आहे'.



सलमानने वाचवलं पण मी खूप रडले
मी रडले. मग सलमान खान माझ्या बाजूने बोलायला आला. बरेच परर्फोमेंस असूनही पायाला झालेली दुखापतीनंतरही सलमानने माझ्यासोबत परफॉर्मन्स दिला. सलमान खानचा चांगुलपणा माझ्या मनाला स्पर्शून गेला. मला खात्री आहे की, आमिरला हे आवडलं नसेल. आमिरच्या वागण्याने मला खूप दु: ख झालं, मी बाथरूममध्ये रडले. मला खूप वाईट वाटलं.


पण मी पुढे गेले आणि चांगली कामगिरी केली, धन्यवाद देवा सलमान वेळेवर आला आणि त्याने मला मदत केली. यशराजचा 'डर' या सिनेमासाठी दिव्य भारती आधी फायनल होत्या मात्र अमिरने या सिनेमांत भारती ऐवजी जूहीला घ्यावं अशी विनंती केली. यानंतर या चित्रपटात जूही, आमिर आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार हे फायनलं झालं. मात्र त्यानंतर शाहरुखने चित्रपटात आमिरची जागा घेतली