मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. कधी अभिनेत्री मलायका अरोरा असलेलं नातं असो किंवा मग बहिणींसोबत असलेलं नातं. जान्हवी कपूर, खुशी कपूर, अंशुला कपूर आणि  वडील बोनी कपूर ही सर्व नाती त्याच्या आयुष्यात महत्त्वाची असली तरी, तो ज्या नात्यांना सर्वांत जास्त महत्त्व देतो, त्याचा खुसाला खुद्द अर्जुनने स्वतः केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने कुटुंब आणि नात्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. पोस्टमध्ये अर्जुन म्हणतो, 'फक्त रक्ताची नाती म्हणजे कुटुंब नसतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही एक नातं असतं जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं असतं.'



अर्जुन पुढे म्हणाला, 'काही नाती तुम्ही जसे आहात तसं ते तुम्हाला स्वीकारतात. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी ती व्यक्ती काहीही करण्यासाठी तयार असते. काहीही झालं तरी ती व्यक्ती तुमच्यावर नेहमीच प्रेम करते...'


अर्जुनची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून अर्जुन आणि मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी त्यांच्या कबुली देखील दिली. पण वयाच्या अंतरामुळे दोघांना कायम ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी लोकांना अधिक महत्त्व न देता नात्याला अधिक महत्त्व दिलं...