मुंबई : नीलम कोठारी 90 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. नीलम यांनी 1984 मध्ये रिलीज झालेल्या 'जवानी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटापासून ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. सगळीकडे फक्त तिचिच जादू होती. या काळात अभिनेत्रीचं नावही अनेक अभिनेत्यांशी जोडले गेलं. धर्मेंद्र यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलसोबतही नीलम यांचं नाव जोडलं गेलं. दोघंही जवळपास ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अशा परिस्थितीत दोघंही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण अचानक बातमी आली की, नीलम आणि बॉबीचं ब्रेकअप झालं आहे. अशा परिस्थितीत पूजा भट्टमुळे बॉबी आणि नीलम वेगळे झाल्याची कुजबुज सुरू होती. तर काहींनी धर्मेंद्र यांना याच कारण सांगितलं. मात्र, यामागील सत्य काय आहे, हे कोणालाच कळलं नाही. आता अनेक वर्षांनंतर नीलमनेच तिच्या आणि बॉबी देओलच्या ब्रेकअपवर मौन सोडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 च्या दशकात बॉबी देओल आणि नीलम कोठारी सुमारे 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता स्टारडस्टला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीलमने तिच्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे. नीलमच्या म्हणण्यानुसार, तिसर्‍या व्यक्तीमुळे तिचं आणि बॉबीचं नातं तुटलं नाही, तर दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.


नीलम पुढे म्हणाली, या निर्णयाचा कोणाशीही संबंध नाही. मला फक्त स्टारची बायको म्हणून माझं करिअर संपवायचं नव्हतं. मला फक्त भीती वाटत होती. मी खूप घाबरली. मी त्या भीतीचे वर्णन करू शकत नाही. वाटलं आता ही भीती संपेल. मी नंतर काहीही चुकीचं होईल याबद्दल विचार करू शकत नाही. त्यामुळे मी उशिरा निर्णय घेतला. पण नंतर कळलं की, अजून उशीर झालेला नाही.


बॉबी देओल आणि नीलम कोठारी यांच्यातील नातं संपुष्टात येण्याचं कारणही धर्मेंद्र असल्याचं सांगितलं जात होतं. बॉबीने नीलमसोबत लग्न करावं असं धर्मेंद्र यांना वाटत नव्हतं, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. हेच कारण होतं की, जेव्हा बॉबीने वडील धर्मेंद्र यांना स्वतःबद्दल आणि नीलमबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी बॉबीला नीलमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बॉबी कधीही त्याच्या वडिलांच्या सल्ल्यापासून दूर जात नाही, म्हणून त्याने नीलमपासून अंतर ठेवलं आणि त्यांचं नातं संपलं. याशिवाय, बॉबी देओलच्या आयुष्यात पूजा भट्टच्या एन्ट्रीमुळे त्याने नीलमसोबत ब्रेकअप केल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. पण, खुद्द नीलमनेच तिच्या मुलाखतीनं या सगळ्या कथांना पूर्णविराम दिला आहे.


बॉबी देओलशिवाय नीलमचे नाव  गोविंदासोबतही जोडलं गेलं होतं. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. या काळात दोघांची जवळीक वाढल्याचं बोललं जातं. गोविंदा नीलमवर मनापासून प्रेम करत होता, पण तोपर्यंत तिचं लग्न झालं होतं. गोविंदानेही आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि त्यामुळेच तो नीलमपासून दुरावले आणि सुनीतासोबत लग्न केलं.