मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने नवीन वर्षांत आपला ४०वा वाढदिवस साजरा केला. आपल्या दमदार अभिनयाने विद्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे विद्या चर्चेत आली आहे. वयाच्या चाळीशीनंतर महिला अधिक हॉट होत असल्याचं विधान विद्याने केलं आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या वाढदिवशी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत विद्याने महिलांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 'महिलांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर अधिक आत्मविश्वास निर्माण होतो. त्या आधीपेक्षा हॉट होतात. या वयानंतर महिला अधिक काळजी करत नाही आणि जीवन जास्त खास पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत असतात. चाळीशीच्याआधी महिला काही प्रमाणात लाजऱ्या असतात. जेव्हा आपण इतरांचा विचार न करता आपल्या पद्धतीने जीवन जगत असतो तेव्हा आपण जीवनाचा अधिक आनंद घेत असल्याचं' तिने सांगितलं. 


'मी माझ्या आयुष्यात मागे जात आहे. मी गंभीर होण्याचा प्रयत्न करते परंतु मी सगळं काही विसरून जीवनाचा आनंद घेत आहे. जेव्हा मी २० वर्षांची होती तेव्हा माझ्या स्वप्नांविषयी चिंतीत होती, ३०व्या वर्षी मी स्वत:ला ओळखलं आणि आता चाळीशीनंतर मी जीवनावर माझ्या जीवनावर प्रेम करायला लागली असल्याचं' विद्यानं म्हटलं आहे. 


आजपर्यंत विद्याने अनेक चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. तिच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. विद्या बालन तिच्या आगामी मिशन मंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.