मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. 'खतरों के खिलाडी' शो संपल्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे श्वेताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे पती अभिनव कोहलीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पत्नी आणि अभिनेत्री श्वेता तिवारीबद्दल काळजी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनव, श्वेता लवकरात-लवकर ठिक हो... असं म्हणाला आहे. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेव पोस्ट शेअर करत म्हणाला, 'माझा मुलगा आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी आमचा वाद न्यायालयात सुरू आहे. पण श्वेता लवकरात-लवकर ठिक झाली पाहिजे फक्त एवढींचं विनंती... कलाकार कायम सर्वांसमोर सुंदर बनण्याच्या धडपडीत, आणि सर्वांकडून अधिक प्रेम मिळवण्यासाठी, आवश्यकतेपेक्षा जास्त वर्क आऊट करतात.. अखेर त्यांना थकवा जाणवतो... '



श्वेताबद्दल सांगायचं झालं तर ती तिच्या प्रोफशनल आयुष्यासोबतचं खासगी आयुष्याबद्दल देखील सतत चर्चेत असते. अभिनव कोहलीसोबत श्वेताचं दुसरं लग्न आहे.  लग्नानंतर काही वर्षांनी दोघे विभक्त झाले. श्वेताने अभिनववर गंभीर आरोप केले, त्यामुळे अभिनवला तुरुंगात जावे लागले. आता दोघे त्यांच्या मुलाच्या कस्टडीसाठी  न्यायालयात पोहोचले आहेत...