मुंबई : 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत सुरुवातीपासून दाखवण्यात आलेला ड्रामा आणि लव्ह-स्टोरी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. रंजक वळणांमुळे रसिकही मालिकेला खिळून होते.  या मालिकेत पात्र साकारणारे सर्व कलाकार आता घराघरात पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पण गेल्या काही दिवासांपासून मालिका इंटरेस्टींग करण्याच्या नादात वेगळ्याच वळणावर जात आहे. मालिकेत ओम, स्विटू, मालविका, नलू मावशीप्रमाणे मोहितच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत होती. मात्र आता प्रचंड प्रमाणात निखिल राऊतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 


मालिकेत ओम आणि स्विटूचे लग्न न झाल्याने आणि मोहितसोबत स्वीटूचा विवाह पार पडल्याने प्रेक्षक देखील काहीसे नाराज झाले आहेत. याचा परिणाम म्हणजे या लग्नानंतर मोहितला चांगलाच ट्रोल केलं जात आहे. त्याच्या खलनायकी भूमिकेचा राग -राग करण्यात येत आहे. त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्या खासगी आयुष्यावरच नेटीझन्स नको नको ते बोलत ट्रोल करत आहे. हे सगळं पाहून निखिल राऊतनेही ट्रोल करणाऱ्यांना सभ्य शब्दात उत्तर दिले आहे. 




 


ट्रोलिंगला कंटाळून अभिनेता निखिल राऊतनेही पहिल्यांदाच मौन सोडले आहे. मुळात निगेटीव्ह भूमिका साकारताना रसिकांच्या रागाला सामोरे जावे लागणार याची कल्पना होतीच. व्यावसायिक आयुष्यापर्यंत  ठिक आहे. भूमिकेबद्दल रसिकांचा राग साहजिक आहे. पण खासगी आयुष्यावरही बोलले जावे हे योग्य नाही. अशा प्रकारे निखिलने आपली बाजू व्यक्त केली आहे.