मुंबई : 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता अभय देओलने याबद्दल माहिती दिली आहे. ऋतिक रोशन आणि फरहान अख्तरसहित सर्व स्टार पुढच्या भागासाठी तयार आहेत फक्त दिग्दर्शकाच्या होकाराची गरज आहे. झोया अख्तर दिग्दर्शित 'जिंदगी न मिलेगी दोबारा' चा सिक्वल येऊ शकतो.  'जिंदगी ना मिलेगी...' च्या रिलीजनंतर याच्या पुढच्या भागाविषयी चर्चा रंगली होती. झोया अख्तर याचा सिक्वेल घेऊन येतील याची मला आशा असल्याचेही अभय देओल याने सांगितले.


'गली बॉय' मध्ये व्यस्त 


सिक्वेलला घेऊन फरहानदेखील खूप आनंदी आहे. पण झोयाकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा ती नवी कहाणी घेऊन येईल. आमच्या बाजूने निश्चिंत राहा. आम्ही सिनेमासाठी पूर्णपणे तयार आहोत. सध्या झोया अख्तर आपला आगामी सिनेमा 'गली बॉय' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ही शूटींग पूर्ण झाल्यानंतर ती 'जिंदगी ना मिलेगी...'च्या सिक्वेलचा विचार करेल अशी सर्वांना आशा आहे.