मुंबई : वजन घटवण्यासाठी लोकं अनेक प्रयत्न करतात. त्यासाठी चित्र विचित्र उपाय करतात. पण दोन मित्रांनी चक्क वजन घटवण्यासाठी रोड ट्रीपची निवड केली आहे. या रोड ट्रीपदरम्यान अर्जुनने 14 वजन घटवले आहे. त्याचा प्रवास तुम्ही वाचाल तर थक्क होऊन जाल... 


30 दिवसांचा थक्क करणारा प्रवास ... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन आणि ईशान यांनी झिरो बजेट रोड ट्रीप प्लॅन केली. प्रवासादरम्यान खर्च निभवण्यासाठी त्यांनी पडेल ते काम केले. त्यांच्या हटके अंदाजातून पैसे कमवून अर्जूनने 30 दिवसांचा प्रवास पूर्ण केला. मात्र ईशानने हे टास्क मध्येच सोडला.



 


केवळ नारळपाण्यावर काढले 30 दिवस 


30 दिवस अर्जून केवळ नारळपाणी प्यायला. सुरूवातीला 12 नारळपाणी त्यानंतर हळूहळू शरीराला या डाएटची सवय झाल्यानंतर 8 नारळ, 6 नारळपाण्यावर अर्जुनने पूर्ण दिवस काढला. शेवटच्या टप्प्यामध्ये अवघ्या काही नारळपाण्यावरच अर्जून राहिला. 30 दिवसांच्या या प्रवासामध्ये त्याने सुमारे 14 किलो वजन घटवले. 


30 दिवसांनंतर परतला अर्जून 


घरी पोहचल्यानंतर अर्जुनने आजीच्या हातचा उपमा खाल्ला. अर्जूनने 30 दिवसामध्ये त्याच्या वजनात झालेला बदल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.