मुंबई : तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक असते. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. तमालपत्र खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. तमालपत्रामुळे पोटाचे विकार दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर केल्याने कफ, अॅसिडिटी, पित्त या आजारांवर तुम्हाला आराम मिळू शकतो.


- तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतं. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. 


- तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल, तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. तमालपत्राच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.  


- तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत असणाऱ्या समस्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात घालून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड कारावे. हे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.