मुंबई : आपल्यापैकी बहुतांश लोकांना चहाची चाहत असते. घरात कोणी पाहुणे आले, पाऊस असेल, सर्दी, डोकेदुखी किंवा थकवा यापैकी काहीही कारण असेल तर त्यावर एकच उपाय तो म्हणजे चहा. अगदी बोटांवर मोजण्याइतकी लोकं असतील ज्यांना चहा आवडत नसेल. मात्र चहाच्या बाबतीत आपण एक नेहमी चूक ती म्हणजे चहा थंड झाला ती तो पुन्हा गरम करणं..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हीही थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पीत असाल तर आताच थांबा. कारण असं करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे का. जाणून घेऊया तयार झालेला चहा पुन्हा गरम करून का पिऊ नये. 


पोषत तत्त्व आणि चव निघून जातं


चहा तयार केल्यानंतर तो पुन्हा गरम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चहाची चव आणि सुगंध पूर्णपणे नाहीसा होतो. एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करता तेव्हा ते चहाच्या आत असलेले पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात.


या आजारांचा धोका असू शकतो


जेव्हा तुम्ही चहा गरम केल्यानंतर पिता तेव्हा असं केल्याने चहाचे सर्व गुणधर्म आणि चांगले संयुगं बाहेर निघून जातात. त्यानंतर त्याला चवंही राहत नाही. उलट ते आरोग्यासाठीही नुकसानदायक ठरतं. आम्ही तुम्हाला सांगू की, गरम चहा प्यायल्याने अतिसार, उलट्या आणि पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे गरम चहा पिऊ नये.


माइक्रोबियल ग्रोथ


जर तुम्ही चहा दीर्घकाळ म्हणजे सुमारे 4 तास तसाच ठेवलात तर या काळात अनेक बॅक्टेरिया चहामध्ये प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चहा गरम केलात, तर त्याची केवळ चवंच बदलत नाही तर चहाच्या आत असलेले सर्व फायदेशीर पोषक बाहेर जातात. 


दुसरीकडे बहुतेक लोकं दुधाच्या चहाचं सेवन करतात. ज्यामध्ये सूक्ष्मजीव लवकर विकसित होण्याचा धोका असतो. त्यामुळे जर तुम्ही हर्बल चहा गरम करून पित असाल तर त्याच्या आत असलेले सर्व गुणधर्म देखील निघून जातात. म्हणून, चहा जास्त काळ ठेवू नका आणि गरम करून पिऊ नका.


टॅनिन निघून जातं


जर तुम्ही चहा बराच वेळ ठेवल्यानंतर तो गरम केलात तर त्यातील टॅनिन निघून जातंय. यामुळे चहाची चव पूर्णपणे कडू होते. अशा परिस्थितीत हा चहा तुमच्या तोंडाची चव देखील खराब करतो.