मुंबई : भात खाल्याने वजन वाढते, पोट सुटते म्हणून तुम्हीही भात खाणे टाळता का ? मग भातासंबंधित असलेले तुमचे समज-गैरसमज दूर करण्याची गरज आहे. सेलिब्रेटी न्युट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर सांगते आहे वरण-भात खाण्याचे महत्त्व आणि फायदे...


 हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरण भात खाल्याने तुमच्या हृद्याचे आरोग्य चांगले राहते. तर ब्लड शुगर नियंत्रित राहते. इतकंच नाही तर वरण भात पचायलाही हलका असतो. त्याचबरोबर रात्रीची झोपही नीट येण्यास मदत होते. तसंच भात खाल्याने पोटातील आतडे मजबूत होतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.


विविध फायदे


भातात अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचा प्रभाव मसल्सवरही होतो. वर्कआऊट करत असाल तर भात खाणे लाभदायी आहे. कारण भात खाल्याने वर्कआऊटचे परिणाम लवकर दिसून येतात. भातात मेथिओनिन, व्हिटॉमिन बी१ आणि रेजिस्टेंट स्टार्च असतात. मेथिओनिनमध्ये असलेल्या अमिनो अॅसिडमध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठीही भात खाणे फायदेशीर ठरते.


त्वचेसाठीही फायदेशीर


लिव्हरमधील विषद्रव्य (टॉक्झिन्स) बाहेर टाकण्यासही मदत होते. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, केस पांढरे होणे यावर उपाय म्हणूनही भात खालला जातो. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर देखील भात खाणे फायदेशीर ठरते.