पावसाळ्यात मुले जास्त आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते आणि बाहेर बरेच जंतू असतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या आहारात काहीतरी चांगले समाविष्ट करून, ते संसर्गाशी लढण्यास सक्षम होतील, इम्युनिटी वाढवण्यासाठी मुलांचा आहार चार्ट.....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात मुलं लवकर आजारी पडतात कारण यावेळी बाहेर अनेक प्रकारचे विषाणू पसरलेले असतात आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. मुलांना चिकनगुनिया, डेंग्यू, विषाणूजन्य ताप सहज होतो कारण या काळात त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते.  मुलं अस्वस्थ होतात आणि त्यांच्या शरीरात अनेक प्रकारच्या खनिजांची कमतरता असते. पावसाळा आपल्यासोबत अनेक नवीन जंतू घेऊन येतो.


1.संसर्गामुळे आजारी पडणं


यावेळी नुसता पावसाळा नसून कोविड व्हायरसची साथ आहे. या ऋतूत या दुहेरी त्रासापासून मुलांचं संरक्षण करणं अधिक महत्त्वाच आहे. यासाठी त्यांना पौष्टिक आहार द्या आणि विषाणू दूर करण्यासाठी दही, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी आणि झिंकचा आहारात समावेश करा.


  लसूण


लसूण हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.  जर मुलाची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तो लवकर आजारी पडत नाही.


  कारलं


मुलांना कारलं आवडत नाही पण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.  ते रक्त शुद्ध करतं आणि संसर्गाचा धोका कमी करतं.त्यामध्ये बुरशीविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.


  टोफू 


टोफू पनीर सारखाच आहे आणि मुलांना तो खूप आवडतो.  यामध्ये प्रथिने (प्रोटीन्स) मुबलक प्रमाणात असल्याने त्याचं सेवन फायदेशीर ठरते.


 


हंगामी फळे



ही फळे, हंगामी फळे, लिची, डाळिंब यांचे सेवन केल्याने मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहतं.ही फळं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.


हळद


हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत.  मुलांना हळदीचे दूध पाजल्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढते


 


  ग्रीन सॅलड



मुलांनी शक्य तितकी हिरवे कोशिंबीर खावी, सर्व जीवनसत्त्वे त्यात आढळतात.


 


जंक फूड



 मुलांना जंक फूडपासून दूर ठेवाव, मुलांना तेलकट पदार्थही कमी द्यावे कारण त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते.